मुंबईः मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरु आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची या सभेसाठी उपस्थिती असून यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला इशारा दिलाय.
बारसु येथील रिफायनरीबद्दल बोलतांना आव्हाड म्हणाले की, रिफायनरी कोकणातच करण्याचा अट्टहास का आहे? बारसु येथील आंदोलन वाईट पद्धतीने चिरडण्याचं काम करण्यात येत आहे.
बारसुमध्ये महिलांना अमानूषपणे मारहाण करण्यात आली. परंतु अशा पद्धतीने आंदोलन चिरडलं जाऊ शकत नाही. तसं केलं तर ते जास्त उफाळतं. त्यामुळे सरकारने समजूतदारीची भूमिका घेणं गरजेचं असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
बारसुमध्ये महिलांना आमानूषपणे मारहाण करण्यात आली
आंदोलन चिरडलं जात नाही, ते जास्त उफाळतं
रिफायनरी कोकणामध्ये कशासाठी?
३०-३५ वर्षे रखडलेला बीडीडीचा प्रकल्प आम्ही सुरु केला
आता कुणाविरुद्ध काही बोलायचं राहिलचं नाही
बोललं की आत टाकलं जातं
परिस्थितीविरुद्ध लढणं हाच खरा विद्रोह असतो
पुण्यातल्या रॅप साँगरवर कारवाई करुन अन्याय केला
तुम्ही पन्नास खोके घेतले पण महाराष्ट्राला काय मिळालं
महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र राहिली तर कुणाचा बाप रोखू शकणार नाही
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.