Raju Shetti : गुऱ्हाळघरे बंद केलीत तर सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल; राजू शेट्टींचा थेट इशारा

आता कारखान्याला ऊस (Sugarcane Rate) कमी पडतो, म्हणून गुऱ्हाळघरे बंद पाडण्याचा घाट घालत आहेत.
Shetkari Sanghatana leader Raju Shetti
Shetkari Sanghatana leader Raju Shetti esakal
Summary

साखर कारखान्यांनी टनाला चारशे रुपये जादा दर देऊन वजन काटे डिजिटल केली पाहिजेत.

सेनापती कापशी : ‘गुऱ्हाळघरे पिढीजात आणि शेतकऱ्यांची आहेत. ती साखर कारखान्यांपूर्वीची (Sugar Factory) आहेत. आता कारखान्याला ऊस (Sugarcane Rate) कमी पडतो, म्हणून गुऱ्हाळघरे बंद पाडण्याचा घाट घालत आहेत. ती बंद केलीत तर सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल,’ असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.

चिकोत्रा खोऱ्यातील अर्जुनवाडा, नंद्याळ, सेनापती कापशी, आलाबाद, कासारी येथील आक्रोश पदयात्रेनंतर काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अबोली कांबळे होत्या.

Shetkari Sanghatana leader Raju Shetti
Raju Shetti : 400 रुपये घेतल्याशिवाय उसाचे कांडेसुध्दा तोडू देणार नाही; राजू शेट्टींचा साखर कारखान्यांना स्पष्ट इशारा

शेट्टी म्हणाले, ‘गुऱ्हाळघरे बंद करण्यापेक्षा कारखान्यातील चोऱ्या थांबवा. उसाला चांगला दर द्या. आता गुऱ्हाळघरे बंद नव्हे, ती नाकावर टिच्चून सुरू ठेवू. साखर कारखान्यांनी टनाला चारशे रुपये जादा दर देऊन वजन काटे डिजिटल केली पाहिजेत. त्याशिवाय उसाचे कांडेही तोडू देणार नाही. १९९५ पासून आंदोलन करत आहे. तेव्हापासून परवडत नाही, दर वाढवता येत नाही, असेच कारखानदार सांगत आहेत. आता तर उत्पादन खर्च २२ टक्क्यांनी वाढल्याने शेतकऱ्यांना टनाला ५०० रुपयांचा खड्डा पडला. ३१ मार्चनंतर साखरेचा भाव ३८५० रुपयापर्यंत गेला. त्यातील चारशे रुपये आता शेतकऱ्याला द्या.’

Shetkari Sanghatana leader Raju Shetti
Suresh Khade : मटका बंद न केल्यास पोलिस निरीक्षकांवरच कारवाई करणार; पालकमंत्र्यांचा सज्जड दम

राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, ‘शेट्टी यांनी दुधाला दर मिळवून दिला. उसाला दर मिळवून देण्यासाठी रक्त सांडले. चळवळ राष्ट्रीय पातळीवर नेली. आता मुलींनी शेतकरी नवरा हवा, असे म्हणेपर्यंत संघटनेचे काम सुरू राहील.’ यावेळी राजू शेट्टी यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला दिलेले निवेदन जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी स्वीकारले. संभाजी यादव, उमेश देसाई, सागर कोंडेकर, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आर. के. पाटील, डी. बी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Shetkari Sanghatana leader Raju Shetti
Loksabha Election : राज्‍यात 48 पैकी महायुतीचे 45 खासदार निवडून येतील; BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना विश्वास

न्याय्य हक्कासाठी लढावेच लागेल : जालिंदर पाटील

कोनवडे: ‘गतवर्षीच्या उसाला एफआरपीपेक्षा चारशे रुपये जादा मिळाले पाहिजेत. त्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटवू देणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आपल्यालाच लढावे लागेल,’ असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील यांनी केले. ते म्हसवे (ता. भुदरगड) येथे स्वाभिमानीने काढलेल्या आक्रोश पदयात्रेत बोलताना केले. या पदयात्रेस भुदरगड तालुक्यातील म्हसवे, दारवाड, निळपण, कोनवडे, कुर येथे चांगला प्रतिसाद मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com