रत्नागिरी: महाराष्ट्र (Maharashtra) सरकार फौजदारी कारवाईत घोटाळा करतंय. महाराष्ट्र सरकार उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. साई रिसोर्ट (Sai Resort) गैरकायदेशीर आहे. रिसॉर्ट गैर कायदेशीर असल्याचं मान्य केल, ९० दिवसांत हे रिसॉर्ट पाडायचे आदेश सरकारने दिले मात्र, अद्याप पाडले का नाहीत असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. अनिल परब (Anil Parab) काय बोलतात हे कळत नाही. कधी म्हणातात त्याच्याशी माझा काय संबंध नाही. पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी नोटीस दिली आहे. अशी माहिती किरीट सोमय्या (Kirit Somaiya यांनी दिली. आज ते रत्नागिरीत (Ratnagiri)बोलत होते. अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्ट विरोधात कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी आज ते रत्नागिरीला गेले आहेत.ली
संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना सोमय्या म्हणाले, राऊतांच्या मुलीच्या लग्नाच्या पार्ट्या कुठल्या-कुठल्या हाॅटेलमध्ये दिल्या याची माहिती द्या.असा टोलाही त्यांनी लगावला. जनतेने काय काय सहन कराव? विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट घातला जात आहे. असा आरोपही सोमय्यांनी केला आहे. उद्या पत्रकार परिषद घेणार, मग आत्ताच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत. अशी सवाल त्यांनी यावेळी विचारला.
कोविड सेंटरमधील घोट्याळ्याचं उत्तर यांच्याकडे नाही म्हणून सगळी नाटचं सुरु आहेत.आदित्य ठाकरेंनी नाटकं बंद करावी. गुन्हा केला असेल तर कायदेशीर प्रक्रियेला सामोर जाणार.जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्यांना माफ करणार नाही असा इशाराही सोमय्यांनी दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.