

Konkan Railway
ESakal
रत्नागिरी : कोकण रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी 'रत्नागिरी-दादर पॅसेंजर' रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी आता कोकणवासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मागणीसाठी शनिवारी (ता. ४) कोकणातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांची 'शिवसेना भवन' येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.