

Maharashtra Bandh
ESakal
मुंबई : नीट पेपरफुटीप्रकरणी राजधानी दिल्लीसह अनेक शहरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन काढली जात आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत घोषणा केली असून महाराष्ट्र बंदला डाव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि कोचिंग सेंटर्सनी या बंदला पाठिंबा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तथापि, या महाराष्ट्र बंदमध्ये कोणत्या सुविधा चालू राहणार आणि काय बंद याबाबत सविस्तर जाणून घ्या.