
Maharashtra Floods CM Fadnavis Calls Uddhav Thackeray Allegations on Ministers Absence Ridiculous
Esakal
राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलंय. मराठवाड्यात जे जिल्हे दुष्काळी म्हणून ओळखले जातात त्याच जिल्हात अतिवृष्टी झालीय. पावसाने हाहाकार उडाला असून मदतीसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफसह लष्कराला बोलवावं लागलं आहे. मराठवाड्यात पावसानं हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलीय. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेत उद्धव ठाकरे यांनी मंत्री बांधावर फिरकले नाहीत, मराठवाड्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हास्यास्पद म्हटलं जातंय. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलं.