आता मनमानी पद्धतीने शाळांचे स्थलांतर होणार नाही! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवे नियम लागू

Maharashtra New School Transfer Policy 2026: महाराष्ट्र सरकारने शाळांच्या स्थलांतरासंदर्भात एक कठोर नवीन धोरण लागू केले आहे. आता केवळ विशेष परिस्थितीतच शाळांचे स्थलांतर केले जाऊ शकते.
Maharashtra School Migration

Maharashtra School Migration

ESakal

Updated on

महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील शाळांच्या मनमानी बदल्या थांबवण्यासाठी एक नवीन आणि कठोर धोरण लागू केले आहे. आता धोकादायक इमारत, नैसर्गिक आपत्ती, विकास प्रकल्प किंवा अपुऱ्या भौतिक सुविधा यांसारख्या विशेष परिस्थितीतच शाळांना स्थलांतरित होण्याची परवानगी दिली जाईल. नवीन नियमांनुसार आरटीई मानकांचे पालन, विद्यार्थ्यांचे १००% आधार प्रमाणीकरण, सुरक्षित अंतराच्या मर्यादेचे पालन आणि अतिरिक्त शिक्षकांची तरतूद करणे अनिवार्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com