Maharashtra rain update: Heavy rainfall lashes Raigad : महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल आहे. अशातच पुढचे दोन दिवस रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि सातारा यासह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश संबंधित प्रशासनकडून घेण्यात आले आहे.