शहरात वाढत चाललेल्या बेकायदेशीर बॅनरबाजीवरून अखिल चित्रे यांनी राज्य सरकार आणि महापालिकेवर तीव्र टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटचे नेते असलेल्या चित्रे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, “बॅनरबाबतचा कायदा आणि माननीय न्यायालयाचे आदेश हे फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत का? मंत्र्यांसाठी तो सजावटीचा कायदा आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला. कायद्याची सरसकट अंमलबजावणी व्हावी आणि नियम मोडणाऱ्या मंत्र्यांवरही तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.