बीड: खंडणीला अडसर ठरल्यामुळे मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. खंडणी प्रकरणाची सुरवात आठ ऑक्टोबरला परळीतील धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातून झाली. तेथे झालेल्या बैठकीला सुदर्शन घुले हजर होता हे त्याच्याच जबाबातून समोर आले आहे.