वर्धा जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे.
मागील ४८ तासांपासून पावसाच्या सलग सरी जिल्ह्यातून कोसळत आहेत.\
जिल्ह्यातील ५४ पैकी ५० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
सततच्या पावसामुळे नद्या व नाले तुडुंब भरले असून काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
वर्धा, यशोदा, वणा, लाल नाला आणि पोथरा नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.