मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो अशा भावना व्यक्त केल्या आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू, असेही आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आहे. (Supria Sule on Maharashtra Political Crises)
त्यांच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री असावा तर, उद्धव ठाकरेंसारखा म्हणत आज आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेबांची आठवण येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाळासाहेबांनी माझ्यावर लहानपणापासून प्रेम केल्याचं त्या म्हणाल्या. सुळे म्हणाल्या की, माँ नी त्यांच्यातील असलेली संवेदनशीलता उद्धवजींच्या सगळ्या कृती आणि वागण्याबोलण्यातून दिसते.(Supriya Sule News)
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर लहानपणापासून प्रेम केले आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी ते स्वतः हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंना दिली. शिवसेनेची ही खूप मोठी जबाबदारी होती असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे जर मुख्यमंत्री जर आवाहन करत असतील तर, हा खूप मोठा भावनिक क्षण आहे. राजकारणात यश आपयश, उतार चढाव येतचं असतात. मात्र, शेवटी नातं आणि माणसांचा ओलावा हाच आयुष्यात शेवटपर्यंत टिकतो असे भावनिक मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. (Maharashtra Political News Updates)
बंडखोर आमदार परत येतील का ? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, मी काही ज्योतिषी नाही. मात्र, ज्यावेळी एखादी मुलगी अथवा मुलगा रुसून गेल्यास आई-वडील सर्व चूका पोटात घेऊन तो प्रश्न सोडवतात. भाजपच्या सुरू असलेल्या बैठकांवर बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांना बैठका घेण्याचा अधिकार आहे. आमचं काही दडपशाहीचं सरकार नसून ते कधी नव्हतं आणि कधी असणारही नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीने निधी रोखून धरल्याचा आरोप केला होता. त्यावर सुळे म्हणाल्या की, अनेक माध्यमांमध्ये आणि वर्तमानपत्रांमध्ये कुणाला किती निधी मिळाला आहे याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे यावर आपण अधिक काही बोलणं योग्या नाही. राज्य सरकार धोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून तीनशेहून अधिक जीआर काढले गेले आहेत. त्यामुळे काही चूकीच्या दिशेने निर्णय घेतले जात आहेत का? असे विचारले असता, सुळे म्हणाल्या की, राज्य शासनाचे निर्णय हे माय बाप जनतेच्या हितासाठी असतात त्यामुळे यात कुठलीही लबाडी किंवा स्वार्थ नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.