कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांबद्दल झाला महत्त्वाचा निर्णय

कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांबद्दल झाला महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरेंनी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर केली घोषणा Maharashtra Rains villages those get frequently affected by Flood needs to be relocated Intime Says CM Uddhav Thackeray on Kolhapur Visit
CM-Uddhav-Kolhapur
CM-Uddhav-Kolhapur

कोल्हापूर : गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात विचित्र अशी परिस्थिती ओढवली आहे. अनेक गावं पुरामुळे उद्ध्वस्त झाली. त्यानंतर, सतत पुराचा धोका असणाऱ्या गावांबद्दल आज राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 'कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा. राज्य सरकार त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावेल. पूरग्रस्त भागाची सध्या पाहणी केली जात आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल', असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. (Maharashtra Rains villages those get frequently affected by Flood needs to be relocated Intime Says CM Uddhav Thackeray on Kolhapur Visit)

CM-Uddhav-Kolhapur
केंद्रात नेतृत्वासाठी उद्धव ठाकरेंचे स्वागत, पण..; बावनकुळेंचा टोला

मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्त स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. तसेच पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथील निवारा केंद्रास भेट देऊन संवाद साधला. नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी 2019 चा पूर, सुरु असलेली कोरोनाची परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, देवस्थानचे पदाधिकारी यांनी केली.

CM-Uddhav-Kolhapur
पंकजाताई भाजप सोडा..शिवसेनेत प्रवेश घ्या!

गेल्या काही वर्षांत विविध जिल्ह्यात पूर येण्याचे प्रमाण वाढले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेल्याची परिस्थिती आपल्याला दिसली. अशा वेळी पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहेच. पण त्यासोबत पूरस्थितीचा सरकारने अभ्यास करायला हवा आणि त्यानंतर शासनाने तात्काळ पूरग्रस्तांना मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com