

राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. भरदुपारी घराबाहेर पडणे टाळले जात आहे, तर उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला आहे.