

Mahayuti Government Plan For Gen Z
ESakal
मुंबई : राज्य सरकारकडून नेहमीच महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठं-मोठे निर्णय घेतले जातात. त्यानंतर आता राज्यात मोठ्या प्रमाणात नाराज असलेल्या जेन-झी युवक-युवतींना महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील जेनझींना सरकारच्या बाजूने करण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. ज्यामध्ये जेनझींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.