मुंबईः मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. यादरम्यान काही ठिकाणी हिंसेच्या घटना घडल्या असून सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मागच्या वेळी जेव्हा जरांगे पाटलांचं उपोषण सुरु होतं, तेव्हा संभाजी भिडे त्यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराटी इथं गेले होते. यावेळी मात्र त्यांनी सरकारच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी बोलताना भिडे म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन माणसं मला माहिती आहेत. राजकारणापलीकडे देशाचा विचार करुन काम करणारे दोघे आहेत.
ते पुढे म्हणाले की, शिंदे-फडणवीस हे बनवाबनवी करणारे आणि लबाडीने बोलणारे नाहीत. ते कधीच स्वतःचा हातचा राखून चालत नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मिटेल, अशी बाजू संभाजी भिडेंनी मांडली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी राज्य सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.