मुंबई : राज्य राखीव पोलिस बलाच्या (दौंड) येथील शिपाईपदाच्या भरतीसाठी गेल्या आठवड्यात झालेली लेखी परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या परीक्षेसाठी तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेतील १०० पैकी सुमारे ८५ प्रश्न महाराष्ट्र पब्लिकेशन पोलिस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंचातून निवडल्याचा आरोप करण्यात आला आहे, तशा तक्रारी प्राप्त झाल्याने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश महासंचालक कार्यालयाने जारी केले. ही चौकशी राज्य राखीव सुरक्षा बलाचे उपमहानिरीक्षकांमार्फत सुरू झाली असून ती पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय महासंचालक कार्यालयाने घेतला.