

Maharashtra Weather Update
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईसह राज्यभरात पुनरागमन केले आहे. यामुळे उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. अशातच हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. ज्यामध्ये राज्यातील २८ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.