

Maharashtra Rain
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. पश्चिम घाट आणि सह्याद्री पर्वतरांगांमधील लोणावळा, महाबळेश्वर, ताम्हिणी, भीरा आणि इतर अनेक ठिकाणी ६ ते ८ जुलै दरम्यान ६०० मिमी पेक्षा जास्त ऐतिहासिक पाऊस झाला. ज्यामुळे भूस्खलन आणि पुराच्या घटना घडल्या असून रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाल्याची माहिती आहे.