मुंबई : राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सोमवारी (ता.२०) निवडणूक पार पडली. पाच जागा भाजपने, पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. भाजपने आपली जास्तीची एक जागा निवडून आणली आहे. त्यामुळे पक्षाची महत्त्वाकांक्षा सत्ता मिळविण्यासाठी वाढली आहे. आज मंगळवारी (ता.२१) राजकीय नाट्य रंगल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाचे काही आमदार नाॅटरिचेबल आहेत. (MNS Leader Nitin Sardesai Criticize On Chief Minister Uddhav Thackeray Over Rebellion MLAs)
त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार का या चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून दिल्लीत सत्तेसाठी खलबते सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलवली आहे. खासदार संजय राऊत यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे.
राज्यातील या घडामोडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ट्विट करुन टीका केली आहे. सरदेसाई म्हणाले, नेहमीच नाॅट रिचेबल असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना त्यांचेच आमदार आता नाॅटरिचेबल. गुरुची विद्या गुरुला, असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.