राज्यात पावसाळी अधिवेशन चालू असताना महाविकास आघाडी आणि शिंदे-भाजप गट यांच्यात शाब्दिक चकमक रंगलेली असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उस्मानाबाद येथील एका शेतकऱ्याने आज मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. यात शेतकरी जखमी असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. यामुळे सरकारवर सर्वच स्तरातून टिका होत आहे. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार हे अतिशय असंवेदनशील असं ईडीचे सरकार आहे. पक्ष फोडणे, लोकांना दमदाटी करणे यात ते एवढे व्यस्त आहेत की, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना समजत नाहीत. सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी स्वतः अजित पवार देखील बोलले होते.
आज अजितदादांनी शेतकऱ्यांचा विषय काढला आणि आज चर्चा होणार होती. यामध्ये आमची सगळ्यांची अपेक्षा होती की, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदत करावी परंतु या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वासच नसल्यामुळे या शेतकऱ्याने असे टोकाचे पाऊल उचललेले असावे. या सगळ्याला हे ईडीचे सरकार जबाबदार असून पक्ष फोडून 50 कोटी त्या लोकांच्या घरात जाण्यापेक्षा हे पैसे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले असते. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले असते तर ते चालले असते, अशी टिका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.