

ST bus ticket price increase 2026 Maharashtra
esakal
ST bus fare increase Maharashtra : उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी प्रवाशांना आता वाढीव भाड्याचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १५ एप्रिल २०२६ पासून तिकीटदरात हंगामी वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रत्नागिरीतून मुंबईचे तिकीट ६२ रुपयांनी, बोरिवली ६५ रुपये व पुणे प्रवास ५७ रुपयांनी महागला आहे. मात्र, निमआराम, शयनयान आसनी व शिवशाहीचे दर फक्त दोन रुपयांनी वाढले आहेत.