
राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला! 29 एप्रिलला पुढील सुनावणी
राजद्रोहाच्या आरोपात अटकेत असलेले राणा दाम्पत्याच्या अर्जावर आज मुबंई सत्र न्यायालयात सुनावणी झाली आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत राणा पती-पत्नीला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामिन अर्जावर २९ एप्रिलपर्यंत राज्य सरकराने उत्तर द्यावे, त्यानंतर अर्जावर सुनावणी घेण्याची तारीख ठरवली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा कारागृहातील मुक्काम २९ एप्रिलपर्यंत वाढला आहे. (Navneet Rana Ravi Rana Latest Marathi News)
हेही वाचा: जामिनसाठी राणा दाम्पत्याचा खटाटोप, आज कोर्टात याचिका दाखल करणार
शनिवारपासून राणा दाम्पत्य हे कारागृहात असून राजद्रोहाच्या आरोखाली या पती-पत्नीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता सत्र न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी २९ एप्रिलपर्यंतचा कालावधी दिला आहे. त्यामुळे २९ एप्रिलपर्यंत राणा दाम्पत्याला तरुंगात रहावं लागणार आहे. दंडाधिकारी न्यायालायत त्यांनी जामिन याचिका प्रलंबित आहे. कोणतीही कायदेशीर कार्यवाही न करता हे दाम्पत्य न्यायलयात आले असल्याचा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला आहे. त्यामुळे आता राणा पती-पत्नीच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्यानं अटक झाल्यानंतर आता न्यायालयीन कोठडीत असलेलं राणा दाम्पत्याचे राजद्रोहाच्या प्रकरणात जामीनासाठी प्रयत्न सुरु होते. राणा पती-पत्नी राजद्रोहाच्या प्रकरणात जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज दंडाधिकारी कोर्टातील प्रलंबित जामीनाची याचिका मागे घेणार अशी माहिती मिळत होती. पोलिसांसोबत हुज्जत घातल्याच्या प्रकरणात एफआयआर रद्द करण्याची याचिका राणा दाम्पत्यानं हायकोर्टात केली होती.
हेही वाचा: डोंबिवली, कल्याण, ठाण्याच्या काही भागात बत्ती गूल
Web Title: Navneet And Ravi Rana Police Custody Increased Till 29 April Says Mumbai District Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..