कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच; जयंत पाटलांनी केले भाकित
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच असे भाकित राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या भाकितानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.(NCP Jayant Patil CM Eknath Shinde Devendra Fadnavis Shivsena)
शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, लवकरच पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भातील याचिकांची सुनावणी होणार आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटलांनी मोठे वक्तव्य केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच! आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहित नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
2024 ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्ते येतो, असे भाजपने म्हटले असते तरी लोकांनी त्यांना स्विकारलं असतं. पण आता महाविकास आघाडीचं सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेलं लोकांना पटलेलं नाही. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील. असही जयंत पाटील म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं तेव्हा कोट्यावधींच्या देवाणघेवाण झाली. हे सगळं महाराष्ट्रातील जनतेला पटेल, रुचेल असं वाटत नाही. शिंदेगटालील आमदारांचं पुढच्या टर्मला निवडूण येणं कठीण आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी शिंदे फडणवीस सरकारला लगावला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.