अजित पवारांनी चूक मान्य करावी, त्यांच्यासाठी तेच चांगले : मलिक

Nawab Malik
Nawab Malik

मुंबई : अजित पवारांनी चूक केली आहे, त्यांनी त्यांची चूक मान्य करावी. त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल (शनिवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांनी काही आमदारांसह राजभवनात शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने आपला याला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत.

शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार
 
मलिक म्हणाले, की अजित पवारांनी चूक मान्य करावी, त्यांच्यासाठी तेच चांगले होईल. आम्ही तिन्ही पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेलो आहेत. आज सकाळी अमळनेरचे आमदार भाईदास पाटील परत येतील असे संकेत दिले आहेत. बाकी आमदारही परत येतील, अशी आशा आहे. आम्ही या सरकारला बहुमत सिद्ध करू देणार नाही. त्यापूर्वी नैतिकतेच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचे सरकार चुकीच्या पद्धतीने गठीत करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com