
नितेश राणेंच्या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना संघर्ष वाढणार का अशी चर्चा सुरु आहे.
मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वातावरणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक कारणांवरून सत्ता संघर्ष पहायला मिळत आहे. काल राष्ट्रवादीचे नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केल्यानंतर पुन्हा एकदा भाजपा आणि राष्ट्रवादीतील वाद पेटला आहे. दरम्यान, आता भाजपाचे नितेश राणे यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना (BJP-Shivsena) संघर्ष वाढणार का अशी चर्चा सुरु आहे. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) ट्विटमध्ये म्हणतात, ९३ च्या दंगली नंतर मुंबई माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवली.
आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) असताना ९३ च्या दंगलीतील आरोपींना वाचवतो आहे. म्हणून, आता भगव्याची जबाबदारी आमची, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. आता त्यांच्या या ट्वीटमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता दिसत आहे.
दरम्यान, काल मंत्री नवाब मिलक यांच्यावरील ईडी (ED) कारवाईमुळं राजकीय वातावरण ढवळले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या या ट्विटमुळे हे वातावरण कोणते नवे वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.