मुंबई : ''ज्या पद्धतीने केंद्र सरकार विरोधी पक्षांची सरकारे असणाऱ्या राज्यांमध्ये वागत आहे त्यावरुन त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शिवसेनेकडून (shivsena) करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण आणि त्यानंतर भाजपा नेत्यांकडून (bjp) आलेल्या प्रतिक्रियांचा समाचार 'सामना' च्या अग्रलेखातून आज शिवसेनेनं घेतलाय. आता यावरच भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) यांनी संजय राऊतांवर (sanjay raut) निशाणा साधला आहे. काय म्हणाले नितेश राणे....
‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’असल्यामुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते. गांज्यावर इतके प्रेम बर नाही. अशी खोचक टीका नितेश राणे यांनी ट्वीट करत केली आहे.
सामनातून शिवसेनेची टिका
भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरुन स्पष्ट होते.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आज शिवसेनेकडून सामनातील अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असं म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री बनले या विरोधकांच्या टीकेला संजय राऊतांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.