मुंबईत गैर-भाजप मुख्यमंत्री एकत्र येणार; संजय राऊतांनी दिली माहिती

non bjp chief ministers likely to meet in mumbai to discuss political situation says sanjay raut
non bjp chief ministers likely to meet in mumbai to discuss political situation says sanjay raut e sakal

सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना सध्याच्या देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईत बिगरभाजप मुख्यमंत्र्यांची परिषद होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी दिली.

राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज या पत्रात अधोरेखित करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात याबाबत चर्चा झाली असून मुंबईत अशी परिषद आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे राऊत म्हणाले.

बेरोजगारी, महागाई, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न यासह विविध मुद्द्यांवर आगामी बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय आहे की, शनिवारी 13 विरोधी नेत्यांनी देशातील जातीय हिंसाचार आणि द्वेषपूर्ण भाषणाच्या घटनांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आणि लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले.

non bjp chief ministers likely to meet in mumbai to discuss political situation says sanjay raut
"PM मोदी गप्प का आहेत"; 13 विरोधी पक्षांचा सरकारवर एकत्रित हल्लाबोल

या निवेदनात, 13 विरोधी पक्षांनी म्हटले होते की, देशातील परिस्थितीवर पाहून निराश आहेत की समाजाचे ध्रुवीकरण करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून अन्न, पोशाख, श्रद्धा, सण आणि भाषा यासारख्या मुद्द्यांचा वापर केला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह 13 नेत्यांनी हे निवेदन जारी केले होते.

non bjp chief ministers likely to meet in mumbai to discuss political situation says sanjay raut
तुरुंगात बंद आझम खान यांना ओवेसींच्या AIMIM कडून ऑफर, म्हणाले...

दरम्यान रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर अलीकडेच झालेले हल्ले, विशेषत: पुढील काही महिन्यांत ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तेथे मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी प्रायोजित असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे, ते म्हणाले, "काही राजकीय पक्ष या दोन देवांचा वापर करून देशाच्या एकात्मतेवर घाला घालत आहेत."

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘नवा हिंदू ओवेसी’ म्हणत त्यांनी त्यांची खिल्ली उडवली. 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी करत राज ठाकरे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. शिवसेना नेते राऊत म्हणाले, "महाराष्ट्रातही एका 'हिंदू ओवेसी'ने हनुमान जयंतीची शांतता भंग करण्याचे सर्व प्रयत्न केले. महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे समन्वित प्रयत्न झाले, पण जनता आणि पोलीस संयमी आणि खंबीर आहेत.

non bjp chief ministers likely to meet in mumbai to discuss political situation says sanjay raut
'सेनेची अयोध्या यात्रा राजकीय नाहीतर...', राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com