आता थेट सरपंच निवडीचा निर्णय होणार २९ मार्चला

Sarpanch
Sarpanch

मुंबई - महाविकास आघाडी सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द केलेला असताना त्याचे कायद्‌यात रूपांतर झाले नसल्याचा फटका सरकारला बसला आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 19 जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामुळे, सध्याच्या अर्थसंकल्पि अधिवेशनात सरकारने कायदा केल्यानंतरही या निवडणूका पार पडतील की नाही याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. 

या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 29 मार्च रोजी मतदान; तर 30 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 6 ते 13 मार्च या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 16 मार्च रोजी होईल. 

नामनिर्देशनपत्रे 18 मार्च पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 29 मार्च रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतमोजणी 30 मार्च रोजी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com