पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीला पूर, सीनेला महापूर आला असून शेतातील पिकांमध्ये गुडघाभर पाणी, शेतरस्त्यांची चाळण, अशी दाणादाण अतिवृष्टीने केली आहे. अडचणीत सरकार पाठीशी खंबीर उभारेल व भरपाई देऊन बळिराजाचे अश्रू पुसेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
mantralay
mantralaysakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीला पूर, सीनेला महापूर आला असून शेतातील पिकांमध्ये गुडघाभर पाणी, शेतरस्त्यांची चाळण, अशी दाणादाण अतिवृष्टीने केली आहे. अडचणीत सरकार पाठीशी खंबीर उभारेल व भरपाई देऊन बळिराजाचे अश्रू पुसेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, पंचनाम्याच्या नव्या निकषांमुळे हजारो शेतकरी भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

सोलापुरातील ९१ पैकी ३९ हून अधिक महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पण, सततचा पाऊस (सलग पाच दिवस किमान १० मिलिमीटर पाऊस) आणि अतिवृष्टीने (२५ तासांत किमान ६५ मिलिमीटर पाऊस) बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्यासाठी नवे निकष घातले आहेत. ई-पीक पाहणी ॲपवर पिकांची नोंद करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत होती, पण १५ सप्टेंबरच्या रात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मुदतीत ‘ई-पीक पाहणी’वर नोंद केलेली नाही, त्यांना भरपाई मिळणार नाही, असे अधिकारी सांगत आहेत. अशा शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या दाखल्यावरून किंवा त्यांच्याकडील नोंदीवरून भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भरपाईसाठी पंचनाम्याचे निकष

  • अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक क्रमांक तथा नोंदणी बंधनकारक

  • ई-पीक पाहणी ॲपवर त्या शेतकऱ्याने लागवडीच्या पिकाची नोंद केलेली असावी

  • नुकसान झालेल्या क्षेत्रात जाऊन पंचनामा करावा आणि त्याचा जिओ टॅगिंगचा फोटो घ्यावा

  • तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांवर पंचनाम्याची जबाबदारी; पंचनाम्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत

भरपाईची रक्कम अन्‌ हेक्टरची मर्यादा कमीच

बाधित शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २६ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये (तीन हेक्टरपर्यंत) मदत मिळत होती. मात्र, आता दोन हेक्टरपर्यंतच भरपाई मिळणार आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार आता हेक्टरी साडेआठ हजार रुपये, बागायतीसाठी १७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार ५०० रुपयांची भरपाई मिळणार आहे. पंचनामे झाले म्हणून शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी जरी घेतली जात असली तरी त्यांना भरपाई मिळेलच, याची खात्री अधिकाऱ्यांनाही नाही.

सोलापूरच्या जिल्ह्यातील नुकसान

  • महिना बाधित क्षेत्र रक्कम

  • मे ते जुलै २१,९८९ हेक्टर ४०.४३ कोटी

  • ऑगस्ट ५६,९६० हेक्टर ५९.७९ कोटी

  • सप्टेंबर १.५३ लाख हेक्टर १४० कोटी

  • एकूण २,३१,९४९ हेक्टर २४०.२२ कोटी

खरीपाच्या निम्म्याहून अधिक क्षेत्राचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात तीन लाख ३७ हजार हेक्टर (ऊस वगळून) खरिपाचे क्षेत्र आहे. त्यात बाजरी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका अशा पिकांचा समावेश आहे. यंदा खरिपात चार लाख १७ हजार हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली. परंतु, मे, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील दोन लाख ३२ हजार हेक्टरवरील (एकूण लागवडीच्या ५३ टक्के) पिकांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com