Vidhan Sabha 2019 : येणारी वर्षे आश्वासक; पुण्यात मोदींचा तरुणांना धीर देण्याचा प्रयत्न

Vidhan Sabha 2019 : येणारी वर्षे आश्वासक; पुण्यात मोदींचा तरुणांना धीर देण्याचा प्रयत्न

पुणे : आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर चिंतेत असलेल्या तरुणांना आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील प्रचारसभेत त्यांनी तरुणांना चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. 'कोणी कितीही अप्रचार करण्याचा प्रयत्न केला तरी, येणारी वर्षे ही आश्वासक आहेत. जगातील अनेक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत,' असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर तरुणांना धीर देण्याचा प्रयत्न केला. देशात गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकार, आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही पंतप्रधान मोदींनी दिली.

पुण्यातील एस पी कॉलेज येथील मैदान येथे आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, पुण्याचे लोकं ज्ञानी आहेत. पुणे ही महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमि आहे. पुण्यासह इतर शहरात कनेक्टिव्हिटी महत्त्वाचा भाग बनला आहे.  हा नवा हिंदुस्थान आहे कोणालाही न घाबरणारा. संपूर्ण जगात भारताचा डंका वाढत आहे. 130 कोटी भारतीयांमुळे जगात भारताचं नाव आहे. देशाच्या विकासात प्रत्येक भारतीयाचं योगदान आहे. कलम 370 रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. भीम अॅप, रुपे कार्ड विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक बनला आहे. 

पुणेकरांनी चुकीचं उत्तर दिले

देशात बदल दिसत आहे का? निर्णयांमध्ये ठाम भूमिका दिसत आहे का?, असे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनतेला विचारले. त्यावर उपस्थितांनी मोदी मोदी, असा जल्लोष करण्यास सुरवात केली. त्यावर मोदी म्हणाले, 'पुणेकरांनी चुकीचं उत्तर दिले. हे सगळं माझ्यामुळं हे शक्य झालेलं नाही. तुमच्या जनादेशामुळे झाले. याच्या मागे प्रचंड जनादेश आहे. 130 कोटी जनतेने हा जनादेश दिला आहे. त्यामुळे जगातील कोणताही बडा नेता माझ्या हातात हात देतो तेव्हा त्याला 130 कोटी जनतेचा जनादेश दिसतो.'

काय म्हणाले नरेंद्र मोदी ?

लोकमान्य टिळकांनी स्वराज्यासाठी लोकांना एकत्र केलं; आता सुराज्यासाठी एकत्र येऊ

- नवा भारत घाबरणारा भारत नाही; या भारतात, प्रचंड आत्मविश्वास

- 370 कलम हटवणे सोपे नव्हते; अनेकांनी यात अडथळे आणले 

- कोणीही कितीही दिशाभूल केली तरी, आगामी वर्षे आश्वासक आहेत

- जगभरातून गुंतवणूकदार भारतात येण्यास उत्सुक आहेत
गुंतवणुकीत सुधारणेसाठी सरकार पावले उचलण्यास सरकार तयार

- मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल

- सुरक्षा, स्वच्छता आणि वेग यावर रेल्वेमध्ये एकाच वेळी काम
पुण्याची इतर शहरांशी कनेक्टिविटी वाढली आहे; उडान 
नव्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात नोकरीच्या नव्या संधी निर्माण होणार

- पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमिचे लक्ष्य निश्चित पार करू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com