मुंबई : हनुमान चालिसा पठण प्रकरणात मनसेच्या २८ हजार कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला होता, या आरोपानंतर पोलिसांनी आज राज ठाकरे यांचा हा दावा खोडून काढला आहे. पोलिसांनी स्पष्टीकरण देत १३ हजार २५८ मनसैनिकांवर कारवाई झाल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्र पोलिसांकडून स्पष्टीकरण देत राज ठाकरे यांचा दावा खोडून काढण्यात आला आहे. या प्रकरणी कालपर्यंत १० गुन्हे नोंद झाले होते, त्यामध्ये ६४ लोकांना अटक करण्यात आली होती, ३८६० लोकांवर प्रिव्हेंटीव्ह अॅक्शन घेण्यात आल्या आहेत तर १४९ कलम ची ९३३४ लोकांना नोटीस देण्यात आली आहे. तर राज ठाकरे यांनी २८ हजार लोकांवर कारवाई झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता या आकडेवारी समोर आल्यानंतर ऱाज ठाकरेंनी दावा केला त्याच्या अर्ध्या लोकांवर देखील कारवाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.