Barsu Refinery : 'कोकणाची वाट लावू नका'; बारसू रिफायनरी प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची उडी, मुख्यमंत्र्यांना केलं आवाहन

स्थानिक गावकऱ्यांनी या प्रकल्पाला (Barsu Refinery Project) जोरदार विरोध केलाय.
Barsu Refinery Project Prakash Ambedkar
Barsu Refinery Project Prakash Ambedkaresakal
Summary

मी सर्वांना आठवण करून देईन की, अंतुले मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, पूर्ण वेळ मिळाला तर मी कोकणचा कॅलिफोर्निया करू शकतो. ते खोटं नव्हतं. परंतु, जेव्हा त्यांनी हा प्रयत्न केला.

Barsu Refinery : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरात क्रूड ऑईल रिफायनींग करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलियम उद्योग (Petroleum Industry) ही रिफायनरी प्रस्तावित आहे. या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी सोमवारपासून माती परीक्षण करण्याची सुरुवात झालीये.

स्थानिक गावकऱ्यांनी या प्रकल्पाला (Barsu Refinery Project) जोरदार विरोध केलाय. माती परीक्षणावरुन स्थानिक आणि पोलिसांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उडी घेतली आहे.

कोकणातील (Konkan) बारसू रिफायनरीला आमचा विरोध आहे. एन्रॉनला घालवण्यातही आमची मोठी भूमिका होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) माझं आवाहन आहे की, कोकणाची वाट लावू नका. कोकणात आजही 95 टक्के शुध्द ऑक्सिजन आहे. इथलं वातावरण अत्यंत शुद्ध असल्यामुळं मोठ्या प्रमाणात वनस्पती व प्राणी इथं नव्यानं जन्माला येतात. त्यामुळं ही शुद्धता तशीच टिकली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

Barsu Refinery Project Prakash Ambedkar
Narendra Patil : उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून तोडण्यास शरद पवारच जबाबदार; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

आंबेडकर पुढं म्हणाले, 'राहिला कोकणातील लोकांच्या जगण्याचा प्रश्न, तर मी सर्वांना आठवण करून देईन की, अंतुले मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, पूर्ण वेळ मिळाला तर मी कोकणचा कॅलिफोर्निया करू शकतो. ते खोटं नव्हतं. परंतु, जेव्हा त्यांनी हा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात आलं.'

Barsu Refinery Project Prakash Ambedkar
Mann Ki Baat 100 Episode : बेटी बचाओ ते बराक ओबामांपर्यंत..; जाणून घ्या पंतप्रधानांच्या मनातील 10 मोठ्या गोष्टी

प्रदूषणकारी उद्योग आणण्यापेक्षा इथल्या नैसर्गिक संपत्तीचं व्यवस्थित नियोजन केलं आणि त्याच्याशी संबंधित कोकणी माणसाच्या उद्योगांना चालना दिली तर तेलंगणाप्रमाणंच इथल्या माणसाचं मासिक उत्पन्न वाढू शकते, असं मतही आंबेडकरांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com