मुंबईः देशात पुन्हा एकदा नोटबंदी होणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी पाचशेच्या नोटा शंभर आणि दोनशे रुपयांमध्ये बदलून घ्याव्यात, असं आवाहन त्यांनी केलंय. नेमकी नोटबंदी कधी होणार, याबाबतही आंबेडकर बोलले आहेत.
ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात होते. त्यावेळी आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करीत आहे. तसेच भाजप आहे तोपर्यंत कधीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचा डाव वेळीच ओळखा, असा सल्लादेखील त्यांनी दिला.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, पॅलेस्टाईनमध्ये सध्या घमासान युद्ध सुरू आहे. तशाच प्रकारे भारतातदेखील आरएसएस व भाजप जाती-जातीच्या आरक्षणाच्या नावावर संघर्ष पेटवण्याची शक्यता आहे. परंतु असं काही घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.
नोटबंदीविषयी बोलताना आंबेडकर म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा नोटबंदी होईल. त्यामुळे ज्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी ते पैसे शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांमध्ये त्या कन्व्हर्ट करून घ्याव्येत, असं आवाहन त्यांनी केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.