आषाढी वारीबाबत आरोग्य मंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

Ashadhi Wari Updates | आषाढी वारी
Ashadhi Wari Updates | आषाढी वारीsakal

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, आगामी काळात पार पडणाऱ्या वारीबाबतदेखील राजेश टोपे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. (Rajesh Tope On Ashadi Wari)

Ashadhi Wari Updates | आषाढी वारी
राज्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईत; 24 तासात 1,036 बाधित

टोपे म्हणाले की, आगामी काळात पालखी सोहळा निघणार असून, यामध्ये साधारण 10 ते 15 लाख नागरिक एकत्र येतात. यामुळे अधिक कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे योग्य पालन करूनच हा सोहळा साजरा करण्याचे आता सध्या तरी ठरवण्यात आले आहे. बैठकीमध्ये वारीमध्ये सविस्तर चर्चा पार पडल्याचे टोपे म्हणाले. वारीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या उत्सवामागे लोकांच्या भावना आहेत. त्यामुळे आगामी काळाती होऊ घातलेला वारी उत्सव नक्कीच होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या निर्बंघ लावण्याचा विचार राज्य सरकारचा नसेल, असे आपले मत असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Ashadhi Wari Updates | आषाढी वारी
तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण नगण्य - टास्क फोर्स

पुढे बोलताना टोपे म्हणाले की, मुंबई, पुण्यात रूग्णसंख्या जास्त नोंदवण्यात येत असून, वरील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट सहा ते आठ टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे कठोर आदेश देण्यात आल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये जरी कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असली तर, रूग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे प्रमाण हे फारच नगण्य असं आहे. त्यामुळे ही राज्याच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. बाधित होणाऱ्या नागरिकांपैकी केवल 1 टक्के नागरिकांनाच रूग्णालयात भरती होत आहे. मात्र, यामध्ये गंभीर रूग्णांचा अजिबात समावेश नाही.

Ashadhi Wari Updates | आषाढी वारी
कोरोनाचा संसर्ग वाढतोय, मंत्रिमंडळ बैठकीत काय झाली चर्चा? जाणून घ्या

मास्क वापरण्याचे पुन्हा आवाहन

राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येनंतर टोपेंनी नागरिकांना पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. जरी राज्यात मास्क सक्ती नसली तरी, आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वतःहून मास्क वापरावा असे टोपे म्हणाले. सध्या तरी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्याचा कोणताही विचार नसल्याचेही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी मास्कचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com