'कुत्रे वारकऱ्यांची भाकरी घेऊन पसार होतात, अशीच काहीशी अवस्था आज महाराष्ट्रात झालीय.'
नांदेड : सध्या देशभरात हनुमान चालिसा, मशिद भोंग्यावरुन वाद सुरुय. याच मुद्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधलाय.
शेतकऱ्यांचे (Farmers) प्रश्न सुटत असतील तर आम्ही कुठंही नमाज (Namaz) पडू, हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणू, असं राजू शेट्टींनी (Raju Shetti) नांदेडमध्ये (Nanded) म्हटलंय. सध्या राजू शेट्टी नांदेड दौऱ्यावर आले आहेत. आज माध्यमांशी संवाद साधताना शेट्टींनी राज्यातील महत्वाचे प्रश्न बाजूला पडू लागले आहेत. नको त्या गोष्टींवरुन वाद निर्माण केला जात आहे. त्यातून धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
ते पुढं म्हणाले, एकादशी दिवशी पंढरपुरात (Pandharpur) जमलेले लाखो भाविक पांडुरंगाचं दर्शन झालं की, जेवणासाठी चंद्रभागेच्या वाळूवर बसतात. तेथील मोकाट कुत्र्यांना त्या भाकऱ्यांवर फडशा पाडायचा असतो. मात्र, तिथं वारकरी असल्यानं कुत्र्यांना भाकऱ्या मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. ही कुत्री एकमेकांत भांडतात. भुकूंन-भुकूंन कालवा करतात. भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना हे पाहवत नाही. ते त्या कुत्र्याचं भांडण सोडवायला उठतात. त्याचवेळेस कुत्रे वारकऱ्यांची भाकरी घेऊन पसार होतात, अशीच काहीशी अवस्था आज महाराष्ट्रात झालीय, असं शेट्टींनी नमूद केलंय. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सपशेल फेल गेल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.