प्रवासी ट्रेनमधून तोटाच, रेल्वेला उत्पन्न तर...; रेल्वेमंत्री दानवेंचं मोठं विधान

File photo of Raosaheb Danve
File photo of Raosaheb Danve
Updated on

जालना - प्रवासी गाड्यांमुळे रेल्वेला महसुलात काहीही फायदा होत नाही. केंद्र सरकार जनतेच्या सोयीसाठी प्रवासी रेल्वे चालवतं, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. जालना येथे एका विशेष साप्ताहिक रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते. (raosaheb danve news in Marathi)

File photo of Raosaheb Danve
भाऊबीजेची तयारी सुरू असताना दुर्घटना! चहा पिताच सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू

दानवे म्हणाले की, दररोज (पॅसेंजर) गाड्या चालवून रेल्वेला कोणताही नफा मिळत नाही. खर्च केलेल्या प्रत्येक रुपयामागे ५५ पैशांचा तोटा होता. त्यामुळे प्रवासी गाड्या चालवण्यात काहीही फायदा नाही. पण मोदी सरकार नफ्यासाठी काम करत नाही. जनतेच्या सोयीसाठी आपल्याला या सेवा चालवाव्या लागणार, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याचंही दानवे यांनी नमूद केलं.

File photo of Raosaheb Danve
महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प 'गुजरात'ला; PM मोदी करणार प्रकल्पाचं उद्घाटन

दरम्यान रेल्वे प्रशासन मालगाड्या आणि इतर स्त्रोतांकडून प्रवासी गाड्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न करतं, असंही दानवे यांनी म्हटलं. मराठवाड्यातील लोकांच्या मागणीमुळे खंडवा, प्रयागराज आणि वाराणसी मार्गे छपरासाठी साप्ताहिक रेल्वे सुरू केल्याचंही रेल्वेमंत्री दानवेंनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com