वर्धा - महाराष्ट्र ही क्रांतिकारकांची भूमी आहे. संतांनी अभंगातून समाज सुधारणा केली त्याला साहित्याचीही जोड होती. महाराष्ट्रात आज मराठी शाळा बंद होत आहे त्याची चर्चा या संमेलनात व्हायला हवी. ज्या ज्या मुलांनी मातृभाषेत शिक्षण घेतले त्यांनी सर्वोत्कृष्ट कार्य केले आहे, त्यांनी नोबेल पारितोषिक देशाला मिळवून दिले आहे. त्यामुळे मराठी वाचक आणि पुस्तके आपण जपायला हवे, असं आवाहन शिक्षणमंत्री आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केलं. वर्धा येथे आयोजित साहित्य संमेलनात ते बोलत होते. (Sahitya Sammelan 2023 news in Marathi)
महाराष्ट्राने मराठी विश्वकोशाची निर्मिती केली आहे. मराठी आणि महाराष्ट्र हा साहित्यिकांची सेवा करणारा देश आहे. सरकारने साहित्याची सेवा करता यावी म्हणून ५० लाखांऐवजी दोन कोटींचा निधी दिला, असं केसरकर यांनी म्हटलं.
साहित्य आणि महामंडळाचे कार्यालये हे मुंबईतच राहतील. कारण मराठी भाषा हा आपला आत्मा आहे. मुंबईत साहित्यिक येतात, तेव्हा कुठे राहावे हा प्रश्न त्यांना पडतो. त्यादृष्टीने मराठी भाषा भावनाचे साहित्य भवनात रूपांतर करण्यात येत आहे. त्यामुळे साहित्यिकांना राहण्याच्या दृष्टीने असलेली चिंता आता दूर होणार असल्याचं केसरकरांनी नमूद केलं.
हिंसाचाराच्या बाबतीत शासन आणि साहित्यिकांमध्ये मतभेद होऊ शकतात. दुखावलेल्या साहित्यिकांना मी भेटलो आहे. तसेच त्यात मी मध्यस्थी करणार नाही अशी ग्वाही त्यांना दिली आहे. मराठी भाषा, साहित्य संस्कृती, नाट्य टिकली पाहिजे. यातील धूसर रेष आपल्याला जपायची आहे. मराठी विश्व संमेलनाचे आयोजन करताना सर्व मंडळांना सामील करून घेण्यात येईल. त्यासाठी दहा कोटी ऐवजी पंधरा कोटी रुपयांची तरतूद आम्ही केल्याचं केसरकर यांनी म्हटलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.