कोरेगाव भीमा प्रकरण : आरोपी नवलखा, तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा!

Koregaon-Bhima
Koregaon-Bhima

नवी दिल्ली : कोरेगाव भीमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता.६) या प्रकरणातील आरोपी आणि नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना दिलेल्या अटकेपासूनच्या संरक्षणाची मुदत १६ मार्चपर्यंत वाढविली आहे.

नवलखा आणि तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन नाकारण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर १६ मार्चला सुनावणी घेणार असल्याचे न्या. अरुण मिश्रा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सांगितले.

उपलब्ध पुरावे पाहता नवलखा आणि तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारीला त्यांचा जामीनअर्ज नाकारला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी, यासाठी चार आठवडे अटकेपासून संरक्षण दिले होते. या संरक्षणात शुक्रवारी वाढ करण्यात आली. 

दरम्यान, कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरेगाव भीमा या ठिकाणी १९८४ वेळी काय परिस्थिती होती. तसेच त्यापूर्वी कोरेगाव भीमा परिसरात कुठली अनुचित घटना घडली होती का? या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांबद्दल अधिकाऱ्यांचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे आणि महत्त्वाची बाब म्हणून त्या काळात केलेल्या दूरध्वनी संभाषणांची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर विभागाला दिले आहेत.

तसेच कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. शेकडो लोकांचे गुन्हे मागे घेण्यात आले असले तरी ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे, अशा लोकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत, अशी माहितीही गृहमंत्री देशमुख यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनावेळी दिली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com