
मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे गट, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली. (Dasara Melava news in Marathi)
उद्धव ठाकरे म्हणाले की, माझं स्पष्ट मत आहे...देशातील लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न आहे. शिवसेना संपत चालली आहे....सर्व पक्ष संपणार असे म्हटले जाते आहे...मात्र असे होणार नाही. गुलामगिरी तुम्हाला परवडणार आहे का, असा सवालही उद्धव यांनी केला.
दरम्यान मोहन भागवतांविषयी आदर आहे. गेल्या काळात ते मशिदींमध्ये गेले होते. का गेले, त्यांनी नमाज पढायला सुरुवात केली का? मशिदीतून बाहेर पडल्यावर मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत असे मुस्लिमांनी म्हटले. आम्ही कॉग्रेससोबत गेलो तर लगेच ओरड सुरु होते हिंदुत्व सोडलं.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी उत्तराखंडमधील घटनेचा उल्लेख केला. उत्तरखंडमध्ये भाजपच्या नेत्याच्या मुलाने तरुणीचा खून केल्याचं समोर आलं आहे. यावरून उद्धव यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.