मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवणार आहे. यासाठी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा आंतरवलीत उपोषण सुरु केलं आहे.
अधिवेशन लवकरात लवकर घ्यावं यासाठी ते सरकारवर दबाव निर्माण करत आहेत. पण आता खात्रीलायक सुत्रांच्या माहितीनुसार, हे अधिवेशन १८ फेब्रुवारीनंतर होण्याची शक्यता आहे. पण अधिवेशन अद्याप का रखडलंय? याचं कारणंही समोर आलं आहे. (special session for maratha reservation to be held in maharashtra after February 18 delay for this reason)
'या' काळात होणार विशेष अधिवेशन?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राज्य प्रशानातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान अधिवेशन घेतलं जाणार आहे. त्यानंतर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. तत्पूर्वीच हे अधिवेशन सुरु होण्याची शक्यता आहे. (Marathi Tajya Batmya)
विशेष अधिवेशन का रखडलंय?
दरम्यान, विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात नुकताच राज्यभरात पार पडलेल्या सर्व्हेक्षणाच्या अहवालाची वाट सरकार पाहात आहे. पुण्यातील गोखले इन्स्टिट्युट फॉर पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स तर्फे हे सर्वेक्षण झालं आहे. राज्यभरात यामध्ये २.५ कोटी कुटुंबांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. सलग अकरा दिवस ही मोहिम राबवण्यात आली आहे. याद्वारे मराठा समाजालाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)
मागासवर्ग आयोगाकडून विश्लेषण सुरु
या सर्व्हेक्षणाचे निष्कर्ष आणि विश्लेषणाचं काम सध्या राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुरु आहे. येत्या काही दिवसात याचा अहवाल आयोग सरकारला सादर करण्याची शक्यता आहे. त्यामुळं एकदा हा सर्व्हेक्षणाचा अहवाल आमच्याकडं आल्यानंतर आम्ही विशेष अधिवेशनाचं नियोजन करणार आहोत, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.