

बेळगाव – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात आज सकाळी एक भीषण अपघात घडला. कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला, ज्यामध्ये सहा वाहनांना धडक बसली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून, घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे.