तुळजापूर : जून संपत आला तरी राज्यात पाऊस नाही. राज्यात पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. अनेक समस्यांना सामोरे जात असलेल्या अन्नदाता शेतकऱ्यांवर पुन्हा संकटाचे सावट आहे. सांगूनही सरकार काहीच ऐकत नाही. राज्यातील सरकार सुलतानी आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पटोले यांनी शुक्रवारी तुळजाभवानीमातेचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येऊ नये, असे साकडे घातल्याचे सांगून त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. कोरोनानंतर राज्यात असंवैधानिक सरकार आले. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. राज्यात भ्रष्टाचारी यंत्रणा उभी रहिली आहे.
कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे अशी सूचना केली होती. त्यानुसार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही सूचना पाळून शेतकऱ्यांची अपेक्षापूर्ती केली होती. भाजपचा चेहरा शेतकरी विरोधी आहे, हे स्पष्ट झाले आहे. खोटे बोलणे आणि मूळ प्रश्नांना बगल देणे ही त्यांची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील, सोलापूरचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉंग्रेस विचाराचे सरकार हवे
राज्यास व देशात कॉंग्रेस विचाराचे सरकार आले पाहिजे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ मतदारसंघांचा आढावा घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार का, यावर पटोले म्हणाले, तसे काही होणार नाही. विरोधक अशा प्रकारची आवई उठवतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.