
राज्यपाल कोश्यारी त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळं अडचणीत सापडले आहेत.
सातारा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळं अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर राज्यपाल बोलताना म्हणाले होते, ‘गुजराती आणि राजस्थानी लोकांना मुंबई (Mumbai) आणि ठाणे शहरातून हाकलून दिल्यास इथे काहीही शिल्लक राहणार नाही. देशाची आर्थिक राजधानी असल्याचा टॅगही मुंबईतून हिसकावण्यात येईल.’ आता या वक्तव्यावर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिलीय.
उदयनराजे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्राने (Maharashtra) देशाला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. इतकंच नाही तर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून उभारलेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलीय.
मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर वाद सुरू झाला. त्यानंतर राज्यपालांनी सारवासारव केलीय. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान असल्याचं त्यांनी म्हटलंय. यानंतर आपल्या वक्तव्यातून महाराष्ट्र किंवा मराठी व्यक्तीचा अपमान होणार नाही, अशाप्रकारचे स्पष्टीकरण दिलं मात्र त्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह विविध नेत्यांनी कोश्यारींच्या वक्तव्यावर टीका केली. तर उदयनराजे भोसले यांनी तर दुसऱ्या राज्यात जावे, असा संताप व्यक्त केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.