
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनी 'महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते मी करेन' असे ठणकावून सांगत राज ठाकरेंसोबत युती करण्यास सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. यावरुन महापालिका निवडणुकांआधी शिवसेना पुन्हा अखंडित होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.