

Railway Project Fund
ESakal
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी तब्बल २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस सरकारच्या काळातील निधीच्या तुलनेत ही तरतूद सुमारे २० पट अधिक असून, यामुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.