रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली, राहुल गांधींना म्हणाले..

बदनापूर (जि.जालना) : बदनापूर येथे आज शुक्रवारी (ता.२०) नागरी सत्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली.
बदनापूर (जि.जालना) : बदनापूर येथे आज शुक्रवारी (ता.२०) नागरी सत्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली.

बदनापूर (जि.जालना) : बदनापूर येथे आज शुक्रवारी (ता.२०) नागरी सत्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना पुढे सांगितले की, 'या देशाला प्रधानमंत्री कोण पाहिजे? असा प्रश्न केला तेव्हा उपस्थित जनतेने सांगितले मोदी पाहिजे. तेव्हा दानवे म्हणाले की पण काही लोकांना राहुल गांधी पाहिजे. मी आणि राहुल गांधी वीस वर्षे एकाच सभागृहात बसत होतो. देवाला जसं गोरं सोडतात ना, असे दानवे म्हणताच उपस्थितांत हशा पिकून कुणी तरी वळू असे म्हटले तेव्हा दानवे यांनी सांड असा शब्द प्रयोग करीत तो शेतीच्या व कोणत्याही कामाचा नसतो, असे सांगितले. एकूणच केंद्रीय राज्यमंत्री दानवे (Union Minister Of State For Raosaheb Danve) यांच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटणार हे नक्की आहे.

बदनापूर (जि.जालना) : बदनापूर येथे आज शुक्रवारी (ता.२०) नागरी सत्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली.
औरंगाबाद पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू, रावसाहेब दानवेंची गर्जना

भूकंपात देखील आपली वीट हलली नाही

जनतेच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षेत पास झाल्याने माझे केंद्रातील राज्यमंत्रीपद कायम आहे. केंद्रातील १२ मंत्र्यांना काढण्यात आले, अशा भूकंपात देखील आपली विट हलली नाही, तर लोकांच्या जिव्हाळ्याचे रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाल्याने आपल्या भिंतीला आणखी मजबूत प्लास्टर झाले आहे. अशा आपल्या खास शैलीत केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म मंत्री रावसाहेब दानवे यांनी बदनापूर येथे शुक्रवारी नागरी सत्काराच्या कार्यक्रमात उपस्थित जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली नवीन जबाबदारी देखील आपण समर्थपणे पार पाडत त्याचा उपयोग मराठवाड्याच्या (Marathwada) विकासासाठी करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. तर गोपीनाथ गडावरून काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या केंद्राच्या योजनांविषयी असलेल्या भावना जाणून घेत आहे. केंद्रीय अर्थराज्य मंत्रीपदाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्याचे काम करणार आहे, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Union Minister Of State For Finance Bhagwat Karad) यांनी व्यक्त केला.

बदनापूर (जि.जालना) : बदनापूर येथे आज शुक्रवारी (ता.२०) नागरी सत्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली.
चेंडू-चेंडू खेळण्याचे राजकारण आता बंद करा, संभाजीराजेंचा इशारा

बदनापूर तालुक्यात जनआशीर्वाद यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. ही यात्रा बदनापूर शहरात पोचल्यावर जाहीर कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्री.दानवे व श्री. डॉ. कराड यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. यावेळी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, भाजपचे प्रदेश संघटन मंत्री भाऊराव देशमुख, भास्करराव दानवे, मनोज पांगारकर, प्रवीण घुगे, दीपक ठाकूर, रामेश्वर भांदरगे, सिद्धिविनायक मुळे, कपिल दहेकर, सुहास सिरसाठ, अवधूत खडके, जितेंद्र पालकर, बद्रीनाथ पठाडे, हरिश्चंद्र शिंदे, बबन सिरसाठ, अनिलराव कोलते, वसंतराव जगताप, पद्माकर जऱ्हाड, भीमराव भुजंग, सत्यनारायण गेलडा, गणेश कोल्हे, भगवान मात्रे आदींची उपस्थिती होती.

बदनापूर (जि.जालना) : बदनापूर येथे आज शुक्रवारी (ता.२०) नागरी सत्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली.
प्रत्येकजण म्हणेल वाह! सायंकाळच्या चहासह बनवा बेसन क्रिस्पी डोसा

केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, आपल्या आशीर्वादाने मागील ३५ वर्षांपासून मी आमदार - खासदार आहे. यात सर्वाधिक प्रेम बदनापूर मतदारसंघातील जनतेने दिले आहे. आपण मला जनतेच्या परीक्षेत पास करता मात्र मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षेतही यशस्वी झाल्याने मला लोकांच्या जिव्हाळ्याचे खाते मिळाले आहे. अर्थात विरोधक माझे मंत्रिपद जाण्याची वाट पाहत होते. मात्र मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांना अर्धचंद्र मिळूनही आपल्या भिंतीची वीट हलली नाही. यावेळी भागवत कराड यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोचवत असून त्यांच्या योजनांबाबत असलेल्या भावनाही जाणून घेत आहे. राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर वर्षभरात महत्त्वाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मिळाले. देशाचा बजेट ३५ लाख कोटी रुपयांचा असून त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com