'विरोधी पक्षनेत्यांचा रोख आमच्याकडे, तर आमचा रोख केंद्राकडे'

vijay wadettiwar devendra fadnavis
vijay wadettiwar devendra fadnavisvijay wadettiwar- devendra fadnavis

नागपूर : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्याचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांचं सोयाबीन पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारने देखील मदत करावी, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. त्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर (mahavikas aghadi government) टीका केली होती. त्यालाच आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (minister vijay wadettiwar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

vijay wadettiwar devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांचा मराठवाडा दौरा आणि पंकजा मुंडे आजारी

दोन्ही विरोधी पक्षनेत्यांचं जी भूमिका आहे तीच भूमिका आमचीही आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीवर राजकारण करू नका. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. विरोधी पक्षनेत्यांचा रोख आमच्याकडे असेल, तर आमचा रोख केंद्र सरकारकडे आहे. पंचनामे झाल्यावर शेतकऱ्यांना तत्काळ मदत करू, असे वडेट्टीवार म्हणाले.

राज्यात ३५२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पंचनामे झाल्यावर ओल्या दुष्काळाबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे. पुढील आठ दिवसांत सर्वच पंचनामे होईल. आमच्या कॅबिनेटच्या प्रत्येक बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चर्चा होते. सर्व पंचनामे आल्यानंतर मदतीची घोषणा करू. आता तत्काळ मदत करून फायदा नाही. कारण रब्बीच्या पेरणीला वेळ आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?

ओल्या दुष्काळामुळे विदर्भ–मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारने राजकारण न करता शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी. एक दुसऱ्याकडे बोट दाखवून काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचं आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com