'जाने तू या जाने ना' अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. जरी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. इम्रानने अवंतिका मलिकसोबत लग्न केले होते, पण 2019 पासून हे स्टार्स वेगळे राहत आहेत. घटस्फोटाच्या अफवांवरही दोघांनी मौन पाळले आहे.
अवंतिका मलिकच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा लक्ष वेधून घेतात. पुन्हा एकदा हे कपल एका पोस्टमुळे चर्चेत आले आहे. खरं तर, अवंतिका मलिकच्या लेटेस्ट पोस्टनंतर, चाहते पुन्हा एकदा हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की या जोडप्याचा घटस्फोट फायनल झाला आहे की नाही?
अवंतिका मलिकने तिच्या इन्स्टा स्टोरीजवर मायली सायरसच्या गाण्याचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये घटस्फोटाचे बोल आहेत. पोस्टमध्ये लिहिले होते, "‘घटस्फोट तिच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट होती’ असं लिहिलंय. पुढे तिने लिहिलं आहे की, ‘ फक्त तिच्यासाठी नाही…’ शिवाय अवंतिकाने #justsaying या हॉशटॅगचा देखील वापर केला आहे.
इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांनी २०११ मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला एक मुलगीही आहे. 2019 मध्ये त्यांच्या विभक्त झाल्याच्या अफवा इंटरनेटवर पसरल्या होत्या. ते वेगळे राहत असल्याचे सांगण्यात येत होते. ‘जाने तू… या जाने ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इम्रान २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कट्टी बट्टी’ सिनेमातून चाहत्यांच्य भेटीस आला. त्यानंतर तो मोठ्या पडद्यावर कधी दिसला नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.