...तब्बल दोन महिन्यानंतर करण जोहरचे सोशल मीडियावर पुनरागमन..!

दोन महिन्यानंतर करण जोहरचे सोशल मीडियावर पुनरागमन..!
दोन महिन्यानंतर करण जोहरचे सोशल मीडियावर पुनरागमन..!

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर निर्माता करण जोहरवर खूप टीका झाली होती. घराणेशाहीच्या मुद्दावरून त्याला ट्रोलिंग करण्यात आले होते. मात्र आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी त्याने सोशल मीडियावर आपली पोस्ट टाकली आहे. भारतीय ध्वजाचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की, “आपला देश महान आहे. आपल्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि इतिहासाचा खजिना आहे. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद !"

निर्माता व दिग्दर्शक करण जोहर सोशल मीडियावर मौन बाळगून होता. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कमेंट्स करण्यावरदेखील मर्यादा घालण्यात आली होती. त्याशिवाय त्याने असंख्य फॉलोअर्स गमावले आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याने केलेली ही पहिलीच पोस्ट. ही त्याने 14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी पोस्ट टाकली होती, ज्यात त्याने दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली होती. 

त्यात तो म्हणतो , की 'गेल्या एका वर्षापासून तुझ्याशी संपर्क ठेवला नाही. त्याबद्दल मला दोषी वाटत आहे. तुला खूप गरज होती याची मला जाणीव झाली आहे. परंतु मी हे सगळं करू शकलो नाही. ही चूक कमी नेहमी लक्षात ठेवीन. आपण नाते फक्त जोडायलाच नाही पाहिजे तर ते निभावयला पाहिले. आज सुशांत मला शिकवून गेला की, प्रत्येक नातं सांभाळायला हवं. अशा आशयाची पोस्ट करणने टाकली होती. 
------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com